मनाचे श्लोक या मुळ रामदासांच्या अप्रतीम रचनेचे हे विडंबन आहे. जे सद्य परिस्थितीचे सर्वभूत द्योतक भासते.
(मुळ रचना ही नेहमी उच्च व आदरणीय आहे.)
“मनाचे लोक”
मना सज्जना लोक म्हणावे ।
आपले आपण बघावे ।।
तू एवढा मी एवढा म्हणावे ।
कोण तू असेच वागावे ।।
जे आपले वागले आपले म्हणावे ।
लाजही विसरुन जावे।।
स्वार्थ हेची परमार्थ जाणावे ।
बाकी जग विसरुन जावे ।।
सर्व ते पैश्यात मोजावे ।
उरले विसरुन जावे ।।
हेच एवढे आयुष्य पहावे ।
बाकी थोतांड म्हणावे ।।
-J speaks…
